Tuesday, August 31, 2010

उत्तर ............... !


          उत्तर ............... ! 


सांगाया जे पाहीजे ते तुला सांगायाचे राहीले

व्यक्‍त होण्या ह्रदय माझे मागे कसे राहीले


नयनांची भेट होता जे कळो आले असे

बोलण्याची वेळ येता शब्द हरवू लागले


भ्याडपणा असला कसा कोणी नसते साहीले

माघारीचे प्रश्‍न असले हेही नव्हते पाहीले


प्रश्‍न तो आमचाच होता म्हणून फक्‍त काळजी

उत्‍तर त्याचे शोधताना सर्व पणाला लागले.

                                       - समीर पु. नाईक

0 अभिप्राय/comments:

Post a Comment